राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली कार्यालयात सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या उपस्थितीत टाळ्या, थाळी व घंटी वाजवून राष्ट्र रक्षकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेशजी सोनी, अ.भा.सह प्रचार प्रमुख नरेंद्रजी कुमार, श्री डॉ. कृष्णगोपालजी, सह संपर्कप्रमुख रामलाल जी आणि कार्यालय निवासी स्वयंसेवक उपस्थित होते.
मीडियाशी संवाद साधताना सरकार्यवाह म्हणाले, देशात जनता कर्फ्युच्या माध्यमातून लोकसहभागाचे अद्भुत उदाहरण भारताने जगासमोर ठेवले गेले आहे. लोकांनी ज्या प्रकारे हा जनता कर्फ्यु पाळला आहे, त्याद्वारे जात पात, भेदाभेद, संकुचितता, पक्षीय राजकारण यामधून बाहेर निघून सामूहिक शक्तीचे दर्शन घडविले ही मोठी गोष्ट आहे. सरकारने वेळोवेळी असे लोकसहभागाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असेही ते म्हणाले.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या