शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते का? सत्यता जाणून घ्या..

    ----- रवींद्र सासमकर 

    अलीकडे महाराष्ट्रात एक नवीन फॅशन आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जास्तीत जास्त मुस्लिम कसे होते, हे सांगण्याची. याबाबत काही लोकांची स्पर्धाच लागली आहे. कोणी म्हणतो ३५ टक्के होते, कोणी ५७  टक्के सांगतो, काही जण तर ९० टक्के मुस्लिम असल्याचा दावा करतात. अशी ही आकडेवारी फुगवून सांगितली जाते. काही दिवसानंतर कदाचित शिवरायांच्या सैन्यात १००  मुस्लिमच होते, असाही हास्यास्पद दावा हे लोक करु शकतात. त्यांचा भरवसा नाही. शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली, मशिदींना इनामे दिली,  असाही खोटा दावा सातत्याने केला जातो.

 


पण सत्य काय आहे?

शिवाजीमहाराजांच्या पदरी किती मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती? तर शिवाजी महाराजांच्या  पदरी १६५७ सालापर्यंत  चार - पाच मुसलमान होते. १६५८  सालापासून शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८  ची आहे. त्यापूर्वी शिवाजी महाराज त्यांच्या वडीलांचे म्हणजेच शहाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून जहागिरीचा कारभार पाहत होते. त्यावेळी जे आधिकारी होते, त्यात सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार होता. जैनाखान पिरजादे हा सरहवालदार होता. बेहेलिमखान हा बारामतीचा हवालदार होता. १६५८ साली शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली त्यानंतर शिवरायांचा एकही मुलकी धिकारी मुसलमान राहिलेला नाही.

आता शिवरायांच्या सैन्यातील अपप्रचार व खोट्या माहितीने सांगितलेली नावे व त्यांची  सत्यता पाहू. नूरखान बेग हा पायदळाचा सेनापती होता. तो १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो, त्यानंतर येसाजी कंक हे पायदळाचे सेनापती आहेत, नूरखान बेग नव्हे! एक होता सिद्दी हिलाल जो महाराजांकडे येऊन राहिला होता. पूर्वी तो आदिलशाहीत होता. तो होता खेळोजी राजांचा क्रीतपुत्र. म्हणजे विकत घेतलेला गुलाम. मग त्याला हिंदु का केले नाही? तर अडचण अशी होती की त्या काळी जन्माने जो हिंदु नाही, त्याला हिंदु करता येत नाही असा सर्वत्र समज होता. शिवरायांच्या नौदलाचे दोन धिकारी होते. दौलतखान आणि दर्यासारंग. त्या दर्यासारंगला महाराजांनीच १६७९ साली  साली अटक केली. आता दौलतखान का होता? तर  त्यावेळेला स्वराज्यात अनुभवी लोक नव्हते, शिवरायांनी प्रथमच मराठी सैन्याचे नौदल उभे केले होते. म्हणून हा दौलतखान होता. आपला भारतदेश १९४७ साली स्वतंत्र झाला, त्यानंतर दहा वर्ष भारतीय नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख ब्रिटीश होते. कारण आपल्याकडे त्या क्षेत्रातील अनुभवी लोक नव्हते म्हणून. त्याचप्रमाणे दौलतखान ठेवला होता. मात्र दौलतखानानंतर पुढे कायम आंग्रे आणि धुळप यांनी मराठी आरमाराचे नेतृत्व केले आहे.

अफजलखानाचा वध केला, त्यावेळी शिवरायांचे अंगरक्षक होते, त्यापैकी सिद्दी इब्राहीम हा एक होता. त्याचीही स्थिती सिद्दी हिलालसारखी होती. या व्यतिरिक्त शिवरायांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हता. राहिला मदारी मेहतर. तर हे नाव खोटे आहे. त्याला कागदपत्राचा आधार नाही. शिवरायांकडे एक फारसी कारकून होता, त्याचे नाव काझी हैदर. त्याने स्वराज्याशी द्रोह करून १६८२ साली औरंगजेबाला जाऊन मिळाला. शिवाजीमहाराजांनी व्यंकोजीराजांना जे पत्र लिहीलय, त्यात "मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क हेत, तर तुझा विजय कसा होईल? असे स्पष्ट लिहिले आहे. आजही तंजावरी मराठीत मुसलमानाना "तुरुक" म्हणतात.

छत्रपती शिवरायांनी महाराजांनी कुठल्याही मशिदीला नवीन इनामे करुन दिलेले नाही. जी पूर्वीची दोन, तीन मशिदींची इनाम चालू होती, तेवढीच काय ती होती. मात्र शिवाजीमहाराजांनी कोणत्याही मशिदीला नवीन इनाम करुन दिल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही.

शिवाजीमहाराजांनी रायगडावर मशिद बांधली असाही अपप्रचार केला जातो, पण शिवरायांनी कधीही, कुठेही मशिद बांधलेली नाही. परंतु ज्याठिकाणी मंदिरे पाडून मशिदी उभारल्या होत्या, त्या मशिदी शिवरायांनी पाडल्याची उदाहरणे आहेत. एक डाॅ.फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. हा फ्रायर डाॅक्टर होता. तो कल्याण भिवंडीला आला होता. तो लिहितो की तिथे मशिदी होत्या त्या शिवाजीमहाराजांनी पाडल्या  त्याच्याऐवजी महाराजांनी त्यांची धान्याची कोठारे केली आहेत.

छत्रपती शिवाजीमहाराज जसे होते, तसे दाखवण्यापेक्षा ते जसे नव्हते तसे दाखवले जात आहे. कोणताही हिंदु राजा धर्मसहिष्णु असतो, त्याप्रमाणे महाराजही होते. पण याचा अर्थ हिंदु अस्मितेशी तडजोड करणे ही महाराजांची सहिष्णुता नव्हती. "धटासि व्हावे धटl उध्दटासि उध्दट ll" हा त्यांचा  बाणा होता. "सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार" हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे व्रत होते.

 

संदर्भ – १. New Account of East india and persia-nine year travels

      २. शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री.गजानन भास्कर मेहंदळे यांच्या भाषणातुन


अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ अवश्य पहा-

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube.com/watch%3Fv%3D5CDMcBZNNd4&ved=2ahUKEwjLgdPV6NXpAhWE7XMBHVD7BYwQo7QBMAB6BAgDEAE&usg=AOvVaw2lL4x93xA1V9oO8-vWGfPv


Published by @VSKDEVGIRI 

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

shivanand jamadar म्हणाले…
आपण खरचं खूपचं छान महिती सांगितलं आहे .. गैरसमज दूर केलात .. आपलं आभारी आहे....
राजे 🚩 म्हणाले…
जय श्री शिवराय खरे महाराज असेच होते काही डुकर महाराजांना सेक्युलर बनवू पहात आहेत ज्यामुळे खरा इतिहास हा लपवला जात आहे
Unknown म्हणाले…
शिवजी महाराज यांचा खरा इतिहास सांगितला तर यांचे धंदे बंद होतील ना त्या मुळे हे खोटा इतिहास पसरवतात ३५% ५७% ९०% वाले....
🚩🚩जय शिवराय🚩🚩
Unknown म्हणाले…
🚩🚩 राजा शिवछत्रपती आजवर अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. खरे काय लिखीत स्वरुपात सामोरे आणल्या बद्दल धन्यवाद!
अनामित म्हणाले…
खूपच मौल्यवान खूपच मौल्यवान माहिती मिळाली आम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अनामित म्हणाले…
Indian truth