जळगाव येथील स्वयंसेवक रवीजी लढ्ढा यांनी मुलीच्या लग्नातून दिला सामाजिक संदेश...

भरारी फाऊंडेशनसह  लढ्ढा परिवारातर्फे माणुसकीचे दर्शन 

जळगाव जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या चार  विधवा महिलांना मसाला व पीठ दळण्याच्या चार चक्की देऊन केली मदत  



जळगाव । जळगाव शहरातील रा. स्व. संघाचे स्वयंसेवक तथा उद्योजक रवींद्र लढ्ढा यांची सुकन्या डॉ.पायल लढ्ढा यांच्या लग्नानिमित्त लढ्ढा परिवारातर्फे ज्योती हिरामण मेढे (वय 37 रा.धामोडी ता.रावेर), अनिता सुभाष वंजारी (वय 35 रा.तरडी ता.पारोळा), सोनाली विजय पाटील (वय 33 रा.खेडीढोक ता.पारोळा), मनीषा प्रल्हाद पाटील (वय 36 रा.शिरसोदे ता.पारोळा) यांना  भरारी फाउंडेशनच्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत  आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या  या चार विधवा महिलांना मसाला व पीठ दळण्याच्या चार चक्की देण्यात आल्या. यामुळे त्या विधवा व निराधार महिलांना रोजगार निर्माण होणार असून ते स्वावलंबी होऊ शकतील.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून यातून समजाप्रति संवेदनशील  राहून सेवा करण्याचा एक चागला संदेश समाजात  गेला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, चिटणीस पंकज लोखंडे, रवी लढ्ढा ,ज्योती लढा, श्रीराम पाटील, धनंजय खडके, राजेश न्याती व भरारी फौंडेशनचे दीपक परदेशी ,विनोद ढगे ,सचिन महाजन सुदर्शन पाटील, दुर्गेश आंबेकर, बंडू पाटील, मोहित पाटील उपस्थित होते.


Published by @VSKDEVGIRI 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या